Our Program
Recovery Program
Quick Links
दारु पासून दूर! पण कसे?
आपल्या आयुष्याची होळी करणार्या व आपल्या शरीरात ७२ रोगाचा दवाखाना बनविणारे दारूचे व्यसन जगतिल कुठल्यहि औषधा ने, तसेच डॉक्टर, तांत्रिक-मांत्रिक, बाबा महाराज यांच्या कडे जाऊन, गंडे दोरे बांधुन, शपथ घेऊन किंवा भिति देवुन सुटणार नाहि, आणि अशा ऊपायांनी कधी सुटणार ही नाही.
कारण असे अनेक उपाय करुन आपण दारू सोडविण्याचे अनेक प्रयत्न करता. पण किती दिवस? महिना, दोन महिने, सहा महिने, केव्हा केव्हा वर्ष भर शुद्ध आपण दारू पासून दूर राहता. पण! काही दिवसातच कुठलातरी बहाणा मिळाला कि पुन्हा आपल दारू पिणं सुरूच. मग आठ ते दहा दिवस आपण इतकी दारू पिता इतकी दारू पिता की आपण अन्न शुद्धा खात नाही. आठ दिवस तुमचा दारू पिण्याचा मग सप्तताहाच बसतो. असे का होते? दारू सोडायची इच्छा असून देखील दारू का सुटत नाही? याकडे आजपर्यत आपले लक्ष कोणीही वेधले नव्हते. दारू का सुटत नाही याचे महत्वाचे कारण लक्षात घ्या.
सज्जनहो! व्यसन हा एक आजार असून, त्याकरिता शास्त्र शुध्द उपचारच करणे शक्य आहे. अशा परीस्थीतीत दैवी उपचारांचा व्यसन सुटण्यासाठी प्रयत्न करणे, म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असाच प्रकार होय. एक तर अशा उपचारांतून व्यसन लागण्या मागची कारणमिमांसा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना ध्यानात येत नाही. त्यामुळे लवकरच फिरुन पुन्हा ती व्यक्ती व्यसनात अडकण्याची शक्यता जास्त असते.
दुसरे म्हणजे व्यसनीना अनेकदा शरीरिक व मानसिक समस्या असतात. दैवी उपचारात त्यांचाकडे दुर्लक्ष झाल्याने पुढे आणखीनच गंभीर प्रशन नीर्माण होतात. तसेच विड्राल बाबत ही घडू शकते. हे अटळ सत्य आहे. मग दारू का सुटत नाही? याचे महत्वाचे कारण प्रथम लक्षात घ्या. आपल्या ब्रेनमध्ये हजारो केमिक्ल्स आहेत. त्यांना न्युरोट्रन्समिटर म्हणतात. हे केमिक्ल्सशी दारूचा संपर्क आला की, या केमिक्ल्समध्ये पहिल्या पेक्षा जास्त प्रमाणात वाढ होते.त्यामुळे त्या व्यक्तीस काही क्षणापुरता अतुशय उत्साह वाटतो, एक वेगळीच उत्तेजित क्रिया येते, शरीरात जोम वाढतो , काही क्षण लक्षाधिक्ष आहे असे त्याला वाटते, जगात सर्वात मोठा मीच असे खोटे अनुभव दारू प्यायल्यामुळे येतात. आणि दारूची नशा हळू हळू कमी झाली की हा खोटा आनद, हा उत्साह कमी होतो।
मग हा खोटा आनंद अनुभवण्यासाठी ती व्यक्ती पुन्हा पुन्हा दारू पिते. अखेर त्याचे घटक दुष्परिणाम हळुहळू ब्रेन्मधील न्युरोट्रन्समिटरवर होतात व कालांतराने ब्रेन्मधील काही पेशी हळुहळू ब्लॉक होतात, त्यानंतर थोडी दारू पिल्यानंतर त्याला पूर्वीसारखी मजा येत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीस जास्तीत जास्त दारू प्यावी लागते. आणि पुढे रोजच तो दारू पितो. अतिशय प्रमाणात दारू प्यायल्यामुळे पुढे शरीरातील इतर पेशी व शरीरातील रासायनिक कारखाना म्हणजे आपले लिव्हर यावर घटक परिणाम होऊन तिथे चरबी जमा होतो (फैटीलिव्हर) व अखेर किडनीवर परिणाम होऊन लिव्हर सिरोसिस नावाचा महाभयानक जीवघेणा विकार होतो, म्हणजेच पोटात पाणी होतो.
हातापायावर सुज येते व शेवटी नर्व्हज सिस्टमवर कंट्रोल राहत नाही. हे सर्व दुष्परिणाम दारूमुळे ब्रेन्मधील न्युरोट्रन्समिटरवर घटक परिणाम झाल्यामुळे होतात. त्यामुळे दारू एकाकी प्यायची जर बंद केली तर त्या व्यक्तीचे हातपाय थरथरतात, झोप येत नाही. भूक लागत नाही. काही खाल्लं पिल्लं तर उलटी होते. घ्हम येतो आणि तो विशेष करून हातापायाच्या तळव्यावर येतो. चक्कर येतो, अंगाला खाज येतो, फिट्स येतो, पोटात दुखते, थकवा येतो, चमत्कारी भास होतात, कुणीतरी मारायला आले, चोर आले, अंथरुणात साप किंवा ढेकण दिसल्याचे भास होतात व त्याला मारण्याचा सतत प्रयत्न करणे, असे अनेक प्रकारचे मानसिक परिणाम होतात. यालाच अल्कोहोलिक हॉलो सिलेसींस म्हणतात. हे सर्व प्रकार ब्रेन्मधील न्युरोट्रन्समिटरवर घटक परिणाम झाल्यामुळे होतात. हे सर्व दारूमुळेच झालेले असते. त्यामुळे शरीरातील या पेशी दारू प्यायल्याशिवाय काम करीत नाहीत. याच कारणामुळे ती व्यक्ती दारू सोडायची इच्छा असूनदेखील शरीराला त्रास झाला कि पुन्हा पुन्हा दारू पिते. तर मग यावर अखेर उपाय काय? दारू कशी सुटेल? तर बंधुनो यासाठी आपण फक्त २४ तास आगोदर दारू न पिता आमच्या पत्त्यावर कुठल्याही गुरुवारी किंवा रविवारी सकाळी ११:०० वा.येउन प्रत्यक्ष संपर्क करा. कारण आमचा शुद्ध व सात्विक कुठलेही रसायन नसलेल्या प्राकृतिक उपचाराने वरील समस्या कंट्रोल मध्ये येतात. आणे महत्वाचे म्हणजे आशचर्याची गोष्ट अशी की, अलोपथी, होमीयोपथी, आयुर्वेद किंवा युनानी अशा प्रकारचा कुठलेही रसायन नसलेल्या आमच्या शुद्ध व प्राकृतिक उपचाराने दारूमुळे आपल्या शरीरावर झालेल्या घटक समस्या लगेचच संपूर्णपणे कंट्रोलमध्ये येतात.
उदा-अतिशय दारू पिण्याची सवयीमुळे आपले हठ्पाय थरथरत असतील, दारूचा उतारा घेतल्यावर म्हणजेच दारू प्यायल्यावरच हाथ थरथरणे थांबत असेल तर आमच्या प्राकृतिक उपचारानंतर दारू न पितासुद्ध काही मिनिटांतच ९९ टक्के लोकांचे हातपाय थरथरणे लगेचच कंट्रोलमध्ये येतात. तसेच जर आपणास भूक लागत नसेल, काही खाल्लं प्याल तरी उलटी होत असेल तर आमच्या उपचार प्रणालीने उपचार केल्याकेल्या त्या क्षणाला लगेचच कडकडीत भूक लागय्लाक सुरुवात होते व उलटी येणे लगेचच बंद होते. जर आपल्या लिव्हरला सूज आली असे तीही पूर्णपणे कंट्रोलमध्ये येते. तसेच जर आपल्याला झोप येत नसेल. तर कुठलीही झोपीची गोळी व औषध न घेता, आमच्या उपचारानंतर शांतपणे झोप लागते. काही दिवसांतच आपल्या चेहर्यावर एक वेगळीच चमक येते. थकवा कमी होते. अशाप्रकारे दारूमुळे झालेल्या सर्व समस्या दूर होतात. याचमुळे ज्या व्यक्तीची दारू सोडायची मनापासून ज्वलंत इच्छा आहे ती व्यक्ती दारू सोडून देते.
Our Treatment Method in brief
आमच्या उपचार पद्धतीची थोडक्यात माहिती
१) दारूचे दुष्परिणाम मनुष्याच्या शारिरीक, मानसिक आरोग्यावर व कुटुंबियावर देखील घद्तत. त्याचबरोबर त्याचे समाजातील स्थानही ढासळते. याचा प्रामुख्याने विचार करून व्यसनाचे उपचार या तीनही गोष्टींच्या अनुषंगाने केले जातात.
२) दारूचे सेवन करणार्या बद्दलची ओढ कमी करण्याशाठी दारू पिणार्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेकडे विशेष लक्ष दिले जाते. तिया मध्ये व्यसनी व्यक्तीची बालपणा पासून ची संपूर्ण मानसिक जडनघडण व त्याची मानसिक अवस्था समजून घेऊन व त्या व्यक्तीमत्वामधील कोणत्या कारणामुळे अथवा कमतरतेमुळे ती वयक्ती दारूच्या आहारी गेलेली असावा व त्या व्यक्तीच्या परिवारातील व मित्रमंडळीतील कोणत्या व्यक्तीच्या आणि परिस्थितीतील कोणत्या घटक्याचा त्याचा मानसिक आरोग्याचा दृष्टीने महत्वाचा वाटा आहे या सारख्या प्रश्नांची उत्तरे शिधून व्यसनी व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक स्वयंपूर्ण व आरोग्यसंपन्न होईल याकडेदेखील विशेष लक्ष दिले जाते. दारू पिणाऱ्या व्यक्तींना दारूच्या दुष्परिणामांचा शारीरिक व मानसिक परिणाम होऊन काही भयानक विकार जडले असल्याची शक्यता अनेकदा असते. म्हणून संवादातून समस्या समजून घेणे व ह्या समस्या सोडविण्यासाठी तसेच वर्तणुकीत व सवयीत बदल घडविण्यासाठी, चिंतातूर वृत्ती, भित्रेपणा इत्यादी मानसिक विकार दूर करण्यासाठी काही महत्वपूर्ण असे प्राकृतिक उपचार सुचविले जातात.
३) व्यसनी व्यक्ती व तिचे कुटूंबिय यांना देखीलमानसिक आणि भावनिक आधार व व्यरानमुक्तीबदलचे महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले जाते. कारण व्यसनी व्यक्तींचे मानसिक बाल घेतलेले असते. यासाठी त्याची त्याची पत्नी, मुले, पालक यांचे मनोधैर्य वाढवून व्यसनी व्यक्तीस समजावून घेण्यास शिकविले जाते.यासाठीच त्याचे कुटूंबीय त्याचबरोबर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दारू पिणाऱ्या व्यक्तीचे अंक बहाणे असते. उद. मला टेंशन आहे. दिवसभर काम करतो त्या मुले थकवा येतो, झोप येत नाही, नोकरी धंदा नाही, पत्नी भांडते, पतीपत्नी संशय वृत्ती, मला कुणीच समजावून घेत नाही, मी काही रोज दारू पीत नाही. कधी कधी पितो व म्हणतो मला कुणीतरी जेवणात किंवा कशात तरी खायला घातले. माझ्यावर कुणीतरी करणी, जादुटोणा किंवा भानामाई केले आहे. अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी मला कुणीतरी दारूकडे आपोआप ओढते. तर बंधुनो लक्षात ठेवा हे दारू पिण्यासाठी खोटे बहाणे आहेत. असले प्रकार जगात कुठेही नाहीत आपणच आपल्या चुकीच्या विचारांने आपल्या पायावर धोंडा मारून देतो व जगाला दोष देतो.
तर सज्जनहो! लक्षात ठेवा वरील कुठलीही समस्या व टेंशन असेल यासाठी दारू पिऊन किंवा जगातील कुठल्याही तांत्रिक, मांत्रिक, बाबा, भागात, साधू महाराज, देवऋषी यांच्याकडे जाऊन ह्या समस्या केव्हाही मिटणार नाहीत. तर आणखीनच वाढत जातात हे अटळ सत्य आहे. बंधुनो! आपणास दारू सोडायची पूर्ण इच्छा असेल व वरील माहिती आपणास मनापासून पटली असेल तर आमच्या फोनवर संपर्क करून आत्ताच अपॉईंटमेंट घ्या.
Please be advised
महत्वाचे सूचना
१) फोन करून अपॉईंटमेंट घेणे गरजेचे आहे.
२) दारू सोडायचीच हि ज्या व्यक्तीची मनापासून तयारी नसेल त्या व्यक्तीस आमच्या दारू मुक्ती केंद्रात फसवून मारहाण करून जबरदस्तीने ओढाताण करून आणू नये.
३) आमच्या दारूमुक्ती केंद्रात येताना आपल्याबरोबर आपली धरम्पात्नी, मग्न झाले नसेल तर आई किवा सख्खी बहिण तसेच त्याचबरोबर आपल्या घरातील सुशिक्षीत जबाबदार अशी पुरूष व्यक्ती बरोबर घेऊन येणे अत्यंत आवश्यक आहे.
४) आमच्या दारूमुक्ती केंद्रात येतांना चोवीस तास आगोदर दारू न पीत यावे.
५) मी श्री देशमुख असे निवेदन करतो की, मी कुठल्याही प्रकारचा डॉक्टर, वैदु, हकीम किंवा तांत्रिक, मांत्रिक , बाबा, भगत नहि. माझ्याकडे कुठल्याही प्रकाची दैवी शक्ती नाही.
६) कुठल्याही गुरुवार किंवा रविवार ११:०० वा. येणे.